- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील तावशी गावातील एका २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने घरीच लाकडी मयालीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी रात्री ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.नितीन देवचंद राखडे रा. तावशी असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव असून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची? या मानसिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली आहे.
नितीन हा अल्पभूधारक शेतकरी होता.दीड एकर शेतीतून उत्पन्न घेत होता.त्यासाठी त्याला शेतीसाठी बँक तसेच सोसायटीकडून कर्ज घ्यावे लागले.दोन वर्षांपासून कर्ज कुठून फेडावे या विवंचनेत होता.त्यातच उधार उसने करून रब्बी धान पिकाची लागवड केली.मात्र,वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतीला सिंचन करणे शक्य नव्हते.वातावरण बदलाचाही शेतपिकाला फटका बसल्याने रोगराईने धान पीकही फस्त झाले.त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची.या विवंचनेत होता.गुरुवारी १० एप्रिलच्या रात्री नितीनने घरीच लाकडी मयालीला स्वतःच्या दुपट्ट्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.वडील स्वयंपाक खोलीत गेले असता,त्यांना नितीन गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला.घटनेची माहिती मिळताच दिघोरी पोलिसांनी घटनास्थळ घाठून पंचनामा करून नितीनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.घटनेचा पुढील तपास दिघोरी पोलिस करीत आहे.तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करून जीवनयात्रा सपविल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

