- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-साहित्य चोरी हा एक सामाजिक गुन्हाच असल्याचे असे मत विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कवठी येथील मुळ रहिवाशी असलेले सुपरिचित कवी अजय राऊत यांनी व्यक्त केले.
साहित्य लेखन हे आपल्या लेखणीतून स्वतःच्या मनाने लिहिलेले लेखन असते.सरस्वतीचे वरदान आणि ते चोरले की सरस्वतीचे अपमान..! आजकाल अनेकजण ऑनलाईनच्या माध्यमातून कविता वाचतात आणि लिहायला सुद्धा शिकतात.पण असेही काहीजण आहेत की,ते कविता वाचून मूळ कवीचा नाव वगळून त्यात आपले नाव टाकून आपलीच पोळी शेकत असतात.हे कुथे तरी थांबायला पाहिजे.या अश्या चोरट्यांना कठोर शिक्षा मिळायलाच हवी.
वारंवार तुम्ही चुकले तरी पुन्हा लिहिण्याची संधी घ्या, संधीचे सोने करून दाखवावे.साहित्य चोरणाऱ्यांना विनाशकारी विपरीत बुद्धीच म्हणावे लागेल.
साहित्य लेखन करतांना मन लावून वेळात वेळ काढून साहित्यिक लिहितो,पडताळून बघतो,तेव्हाच त्याला समाधान मिळत असते. साहित्याला प्रोत्साहन,उत्तम दाद मिळाला की,साहित्यिकांचा आनंद द्विगुणित होत असतो.परंतु तेच साहित्य कुणी चोरले की,ते त्यांच्या नावाने प्रसिद्धी मिळवितात.त्या वेळेला मूळ लिखाण करणाऱ्यांचे अंतःकरण खूप दुखावले जाते.एखाद्या किंमती वस्तूचीच चोरी झाले तर आपणांस कसे वाटत असते,चोरी करणाऱ्याला काही वाटत नाही.उघडकीस आले की,क्षमा मागून मोकळे होतात.ही समज चुकीची आहे.त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.भावनांचा विचार नक्कीच करावा.साहित्य चोरी हा एक सामाजिक गुन्हा आहे आणि त्यांचा सुळसुळाट वाढला आहे.काहीजण खोटे सन्मानपत्र,खोटी प्रसिद्धी मिळवितात.कितीतरी महान साहित्यिक आहेत; त्यांचे,साहित्य वाचन मनन करा..! आपोआप तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि साहित्य चोरण्याची गरज पडणार नाही; असा संकल्प करावा.स्वतः लिहिलेल्या शब्दात,वाक्यात,काव्यात,साहित्यात खूप समाधान मिळेल.चुकले तरी दुरुस्त करण्याची ओढ आपोआप निर्माण होते.फक्त तसा प्रयत्न करावा; अशी अपेक्षा देखील साहित्य कला मंच तथा साहित्य माझे जीवन समूहाचे संस्थापक अजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
- Advertisement -

