उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यातील मोहाळी येथे आज सकाळच्या सुमारास तीन बिबट्यांनी सहा जणांवर हल्ला केल्याची घटना घडली.बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत.आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रात मोहाळी हे गाव असून घनदाट जंगलाने वेढलेले आहे.आज,१९ जुलै सकाळच्या सुमारास तीन बिबटे गावात आले.लोक शेतीच्या कामावर जाण्यासाठी बाहेर पडले असतानाच या बिबट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये ३५ वर्षीय विजय देवगिरकर, ५० वर्षीय मनोहर दांडेकर,३० वर्षीय जितेंद्र दांडेकर, २५ वर्षीय सुभाष दांडेकर,१८ वर्षीय रितिक वाघमारे व ३१ वर्षीय पांडुरंग नन्नावारे यांचा समावेश आहे.
हल्ला केल्यानंतर हे बिबटे गावातील घरांत शिरले असून,वन विभागाने तातडीने दखल घेत बिबट्यांनी पकडण्याची मोहीम सुरू केली.दुपार पर्यंत एक बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागास यश आले आहे.तर उर्वरित दोन बिबट्यांचा शोध सुरू होता.

