Wednesday, June 3, 2026
Homeचंद्रपूरमहाशिवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सहाजण नदीत बुडाले.. - तीन सख्ख्या बहिणी तर तीन...

महाशिवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सहाजण नदीत बुडाले.. – तीन सख्ख्या बहिणी तर तीन मुले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-महाशिवरात्रीच्या जत्रेला आज,बुधवार २६ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे.सर्वत्र शिवाची आराधना,पूजा-अर्चना करण्यासाठी भाविक भक्त धार्मिक स्थळांना भेटी देऊन नतमस्तक होत असतात. अशातच महाशिवरात्रीनिमित्त वैनगंगा  नदीवर कुटुंबीयांसह आंघोळीसाठी गेलेल्या तीन सख्ख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या असल्याची घटना आज,बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.प्रतिमा प्रकाश मंडल वय,२३ वर्षे,कविता प्रकाश मंडल वय,२१ वर्षे व लिपिका प्रकाश मंडल वय,१८ वर्षे अशी नदीत बुडालेल्या सख्ख्या बहिणींची नावे असून यापैकी दोघींचे प्रेत मिळाले तर एकीचा शोध सुरू आहे.आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या कुटुंबीयांसह गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्याच्या व्याहाड (बुज) येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले होते.नदी पात्रात उतरल्यावर कविता मंडल,प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्ख्या बहिणी पाण्याचा अंदाज आल्याने खोलात गेल्या.पोहता येत नसल्याने त्या बुडायला लागल्या.तर एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात लागल्या. आरडाओरड सुरू झाली,मात्र मदतीला कुणीही नव्हते. यातील तो मुलगा आणि महिला पत्रातील खडक हाताला लागल्याने त्याला पकडून राहिले.मात्र,तीन बहिणी बेपत्ता झाल्या.यातील कविता मंडल व एका बहिणीचे शव मिळाले असून एकीचा शोध सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्याने खडकाला पकडून असलेल्या मुलाला आणि महिलेला वाचवण्यात यश मिळाले.
दुसऱ्या घटनेत,चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील तीन युवक आज बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते.अशातच खोल पाण्यात गेल्याने तिघेही नदीत बुडाले.तुषार शालिक आत्राम वय १७ वर्षे,मंगेश बंडू चणकापुरे वय २० वर्षे, अनिकेत शंकर कोडापे वय १८ वर्षे अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले आहे.या तिघांच्या बाबतीत शोध कार्य सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!