Tuesday, July 21, 2026
Homeचंद्रपूरमहाशिवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सहाजण नदीत बुडाले.. - तीन सख्ख्या बहिणी तर तीन...

महाशिवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सहाजण नदीत बुडाले.. – तीन सख्ख्या बहिणी तर तीन मुले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-महाशिवरात्रीच्या जत्रेला आज,बुधवार २६ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे.सर्वत्र शिवाची आराधना,पूजा-अर्चना करण्यासाठी भाविक भक्त धार्मिक स्थळांना भेटी देऊन नतमस्तक होत असतात. अशातच महाशिवरात्रीनिमित्त वैनगंगा  नदीवर कुटुंबीयांसह आंघोळीसाठी गेलेल्या तीन सख्ख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या असल्याची घटना आज,बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.प्रतिमा प्रकाश मंडल वय,२३ वर्षे,कविता प्रकाश मंडल वय,२१ वर्षे व लिपिका प्रकाश मंडल वय,१८ वर्षे अशी नदीत बुडालेल्या सख्ख्या बहिणींची नावे असून यापैकी दोघींचे प्रेत मिळाले तर एकीचा शोध सुरू आहे.आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या कुटुंबीयांसह गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्याच्या व्याहाड (बुज) येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले होते.नदी पात्रात उतरल्यावर कविता मंडल,प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्ख्या बहिणी पाण्याचा अंदाज आल्याने खोलात गेल्या.पोहता येत नसल्याने त्या बुडायला लागल्या.तर एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात लागल्या. आरडाओरड सुरू झाली,मात्र मदतीला कुणीही नव्हते. यातील तो मुलगा आणि महिला पत्रातील खडक हाताला लागल्याने त्याला पकडून राहिले.मात्र,तीन बहिणी बेपत्ता झाल्या.यातील कविता मंडल व एका बहिणीचे शव मिळाले असून एकीचा शोध सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्याने खडकाला पकडून असलेल्या मुलाला आणि महिलेला वाचवण्यात यश मिळाले.
दुसऱ्या घटनेत,चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील तीन युवक आज बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते.अशातच खोल पाण्यात गेल्याने तिघेही नदीत बुडाले.तुषार शालिक आत्राम वय १७ वर्षे,मंगेश बंडू चणकापुरे वय २० वर्षे, अनिकेत शंकर कोडापे वय १८ वर्षे अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले आहे.या तिघांच्या बाबतीत शोध कार्य सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!