- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी शहरात खळळजनक तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.तीन अल्पवयीनांनी आपल्याच वर्ग मैत्रिणीला प्रेमासाठी दबाव निर्माण केल्याने तणावात गेलेल्या एका मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.मात्र,सदरची बाब आईवडिलांना कळताच मोठा अनर्थ टळला व दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुले आणि एका अल्पवयीन मुलीवर तक्रारी अंती भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८,१२६(२),३५१ (२),सहकलम १२,१६ पोक्सो नुसार गुन्हा नोंद करून काल सोमवारी तिघांनाही भंडारा जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केले असता तिघांचीही जामिनावर सुटका करून ताकीद देण्यात आली.
१७ वर्षीय दोन मुले व दोन मुली दहावीपर्यंत वर्गमित्र होते.नंतर वेगवेगळ्या शाळेत गेले.बारावीत गेल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात नव्हते.मात्र,बारावी विषयांच्या क्लासमध्ये(शिकवणी वर्ग)परत संपर्कात आले.अश्यातच एका १७ वर्षीय मुलाचे एका मुलीकडे आकर्षण वाढून पाठलाग करणे व प्रेमासाठी वाट्टेल ते..असे करणे सुरू झाले.परत सहकारी मित्र व मैत्रीण यांनीही दबाव निर्माण करू पाहला.त्यामुळे ती तणावात गेली.नेहमी हसत खेळत असणारी मुलगी तणावात असल्याचे आई वडिलांच्या लक्षात आले.त्यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता प्रकरणाचा उलगडा झाला. प्रकरणी पालकांनी पवनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.चौकशी अंती धक्कादायक प्रकार पुढे आला. ज्या वयात शिक्षणाची तसेच भविष्याची गोडी निर्माण व्हावी,अश्या वयात शाळकरी मुले वाम मार्गाला जाऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

