उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- मागील वर्षाच्या ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ मध्ये देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात कृत्रीमरित्या वा नैसर्गिकरित्या आलेल्या महापुरामुळे शेतकरी बांधवांच्या उभ्या असलेल्या धान पिकांची तसेच इतर साहित्यांची विल्हेवाट लागून अतोनात नुकसान झाले होते.अशातच गेल्या सात महिन्यांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या ४ कोटी रकमेचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून पाठविण्यात आलेले प्रस्ताव प्रलंबित असल्याने पूरबाधित शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी; अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी यांची शेतकरी बांधवांच्या प्रती कळकळ लक्षात घेता; त्यांनी म्हटले आहे की,माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय वा कुणालाही त्रास होता कामा नये; जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांनी शेती करणे सोडले तर तुम्ही-आम्ही जगूच शकणार नाही? त्यांच्याच भरवशावर आम्ही असल्याने राब-राब जीवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता; सर्वप्रथम त्यांची नुकसान भरपाई मंजूर करणे आवश्यक आहे.सात महिन्यांचा कालावधी लोटूनही नुकसान भरपाई मंजूर न करणे ही शोकांतिका आहे.गडचिरोली जिल्हा आदिवासी,बहुल,अतिदुर्गम तसेच नक्षल प्रभावित आहे.अशातही जिल्ह्यातील ७० ते ७५ टक्के जनता ही धान्य पीक लागवड करीत असतात.शेतकरी बांधवांचे नशीब जरी फाटके असतील तरीही त्यांच्या समस्या सर्वात अगोदर सोडविणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.यासाठी देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील पूरबाधित शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी; अशीही मागणी भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी यांनी केली आहे.त्याच बरोबर शासनास याबाबत अवगत करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची हमी त्यांनी उद्रेक न्युज वृत्ताला दिली आहे.

