Thursday, April 30, 2026
Homeनागपूर२६ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…-प्रेयसी घरी न आल्याचे कारण…..

२६ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…-प्रेयसी घरी न आल्याचे कारण…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- लिव्ह इनमध्ये सोबत राहणारी प्रेयसी खोलीवर न आल्यामुळे एका २६ वर्षांच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल,बुधवारी घडली.

निखिल रामेश्वर बुराडे वय २६ वर्षे,रा.अनमोलनगर, नागपूर असे गळफास घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे. तो मोबाइल शॉपीत कामाला होता.माहितीनुसार निखिलचे स्वागतनगरमध्ये वडिलोपार्जित घर आहे. तेथे त्याचे आईवडील,बहीण आणि मोठा भाऊ राहतो. परंतु मागील २५ दिवसांपासून निखिल एका युवतीसोबत अनमोलनगरात किरायाची खोली घेऊन लिव्ह इनमध्ये राहत होता.ही युवती एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात काम करते.परंतु मागील दोन दिवसांपासून लिव्ह इनमध्ये राहणारी प्रेयसी घरी न आल्यामुळे निखिल संतापला होता.यातच त्याने राहत्या खोलीत छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला.या प्रकरणी रंजना सुनील वारकी वय २३ वर्षे, रा.धरमपेठ यांनी दिलेल्या सूचनेवरून वाठोडा ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद वंदे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!