- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.सध्या धानपिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.१२० दिवसांचे धान परिपक्व झाले असून, कापणीला आलेले आहे.तर १४०-४५ दिवसांचे धान अपरिपक्व असल्याने त्या धानावर लष्करी अळीच्या मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.शेतकरी कीटकनाशक फवारणी करून अळीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु,कीटकनाशक फवारणीनेही अळी कमी होतांना दिसून येत नाही.त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना अळी नायनाट करण्याकरिता कोणते कीटकनाशक फवारायचे आहे.धान पीक संवर्धनाकरिता कृषी अधिकाऱ्याकडून कोणतेही मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळत नसून त्यांची खंत गावागावात दिसून येत आहे.शासनाचे विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाच्या संवर्धनाकरिता येणाऱ्या योजना हे अधिकारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसून अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
धान लागवडीपासून ते धान निघेपर्यंत शेतकरी लाखो रुपये खर्च करतो.परंतु,ते पैसे परत येतील का? याचा नेम नसतो.आधुनिक युगातही वीज,पाणी उपलब्ध असूनही नैसर्गिक पूर,वादळ,अतिवृष्टीमुळे,धान नष्ट करणारी अळी यामुळे पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांचे शेतीत लावलेले पैसे बुडतात.त्यामुळे शेतकऱ्याचे पीक हे नैसर्गिक लहरीवरच अवलंबून असते. शेतकऱ्यांकरिता शासनाकडून अतिवृष्टी झाली,करपा आला,पूर आला की करा पंचनामे व शेतकऱ्यांना चिरीमिरी मदत करून शेतकऱ्यांची शासनाकडून थट्टा केली जाते.
- Advertisement -

