- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात मागील वर्षाच्या २०२३ मधील ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील कोंढाळा,कुरुड, आमगाव व सावंगी गावातील शेतकरी बांधवांच्या उभ्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी; याकरीता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचेसह भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार पुरबाधित शेतकऱ्यांना शासन स्तरावरून नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.अशातच आता शासन स्तरावरून पूरग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याकरिता मोबाईल क्रमांक अनिवार्य केले असल्याने कुरुड,आमगाव व सावंगी गावातील शेतकऱ्यांनी गावातील तलाठी तसेच ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईल क्रमांक दिल्याने सदर शेतकऱ्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र,कोंढाळा गावातील पूरबाधित नुकसानग्रस्त ४५० शेतकऱ्यांपैकी ५८ शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत तलाठी वा ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईल क्रमांक दिले नसल्याने कोंढाळा गावातील शेतकऱ्यांना अजून पावेतो नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली नाही.त्यानुसार आता उर्वरित ५८ शेतकरी मागील वर्षाच्या नुकसानभरपाईच्या रकमेपासून वंचित राहू शकतात.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत मोबाईल क्रमांक दिला नसेल,अशा शेतकऱ्यांनी लवकरात-लवकर मोबाईल क्रमांक देण्याचे करावे; असे आवाहन देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी केले आहे.
सुनील पारधी,देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष👇वर्ष २०२३ मधील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पूरग्रस्त शेतीच्या नुकसानीची रक्कम शासनाकडून केव्हाचीच प्राप्त झाली आहे.त्याचबरोबर वर्ष २०२४ म्हणजेच चालू वर्षातील जुलै तसेच सप्टेंबर महिन्यातीलही पूरग्रस्त शेतीच्या नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली असून शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

