Tuesday, July 21, 2026
Homeवर्धाडिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब लोकांना माहीत पडली तर..अशीच काहीशी घटना आज,बुधवार ३ जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ते बोथुडा मार्गावर घडली.टँकर पलटी झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी डिझेल गोळा करण्यासाठी मिळेल त्या भांड्यासह घटनास्थळी धाव घेतली.लोकांनी चक्क ड्रम,बॅरेल,बादल्या आणि डबे घेऊन खाली सांडलेले डिझेल भरण्यासाठी एकमेकांवर तुटून पडले. टँकरमधून मोठ्या प्रमाणावर डिझेल बाहेर पडल्याने ते जवळच्या शेतात साचले होते,ते गोळा करण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली.डिझेलने भरलेला टँकर आज सकाळी समुद्रपूरच्या दिशेने जात असतांना अचानकपणे वाहनाचे टायर फुटले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.दरम्यान,टँकर महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाला.सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र, परिसरातील नागरिकांनी काहीकाळ डिझेल नेण्याचा सपाटा लावला.घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नागरिकांनी डिझेल नेणे बंद केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!