Sunday, May 17, 2026
Homeदेसाईगंजजंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव परिसरात वळविला मोर्चा....- शेतकरी बांधवांच्या धानांचे केले...

जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव परिसरात वळविला मोर्चा….- शेतकरी बांधवांच्या धानांचे केले नुकसान…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज( गडचिरोली) :- एकीकडे देसाईगंज तालुक्याच्या काही भागांमध्ये वाघ,वाघीण यांची दहशत आहे.अशातच आता जंगली हत्तींनी धुमाकूळ घातला असल्याने सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी बांधव चिंतातुर झाले आहेत.मागील दोन महिन्यांपासून कुरखेडा,देसाईगंज,आरमोरी तालुका परिसरात संचारत असलेल्या रानटी हत्तींनी दोन दिवसांपूर्वी भगवानपूर शेतशिवारात धुमाकूळ घातल्यानंतर आता हत्तींनी पुन्हा देसाईगंज तालुक्याकडे मोर्चा वळविला आहे.तालुक्यातील विसोरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास हत्तींनी विहिरगावच्या शेताशिवारात प्रवेश करीत पीके पायाखाली तुडविली आहेत.यामुळे अनेक हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले असून या हत्तींना तात्काळ हाकलून लावण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

हलक्या व मध्यम प्रतीचे धानपिक आता अंतिम टप्प्यात येत असताना २० पेक्षा वरच्या संख्येत असणाऱ्या जंगली हत्तींचे कळप काल विहीरगावच्या नजीक असणाऱ्या मामा तलावाच्या खालील धानपिकाच्या शेतातून गेले.त्यामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे.यात प्रवीण डोनाडकर,बंडू बनकर, लीलाधर पिल्लेवान,सुधाकर बावणे,नांदाजी नारनवरे या विहीर गावच्या शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे अतोनात नुकसान झाले आहे.

एकीकडे शेतकऱ्यांना जंगलातील वाघाची भीती असताना आता रानटी हत्तींचाही धोका वाढला आहे. आतापर्यंत वाघाद्वारे या भागात कोणतीही हानी जरी नसली तरी शेतकऱ्याच्या जीवाला वाघापासून धोका आहे.त्यात आता जंगली हत्तींद्वारे धान पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.या पट्ट्यामध्ये धान पिकाचे सर्वात जास्त पीक घेतले जाते.धानपिक आता ऐन शेवटच्या टप्प्यात आले असताना हत्ती नुकसान करत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.जंगली हत्तींना पळवून लावण्यासाठी पश्चिम बंगाल येथील एक टीम येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते.मात्र अजूनही सदर टीम न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!