Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजजंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव परिसरात वळविला मोर्चा....- शेतकरी बांधवांच्या धानांचे केले...

जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव परिसरात वळविला मोर्चा….- शेतकरी बांधवांच्या धानांचे केले नुकसान…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज( गडचिरोली) :- एकीकडे देसाईगंज तालुक्याच्या काही भागांमध्ये वाघ,वाघीण यांची दहशत आहे.अशातच आता जंगली हत्तींनी धुमाकूळ घातला असल्याने सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी बांधव चिंतातुर झाले आहेत.मागील दोन महिन्यांपासून कुरखेडा,देसाईगंज,आरमोरी तालुका परिसरात संचारत असलेल्या रानटी हत्तींनी दोन दिवसांपूर्वी भगवानपूर शेतशिवारात धुमाकूळ घातल्यानंतर आता हत्तींनी पुन्हा देसाईगंज तालुक्याकडे मोर्चा वळविला आहे.तालुक्यातील विसोरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास हत्तींनी विहिरगावच्या शेताशिवारात प्रवेश करीत पीके पायाखाली तुडविली आहेत.यामुळे अनेक हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले असून या हत्तींना तात्काळ हाकलून लावण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

हलक्या व मध्यम प्रतीचे धानपिक आता अंतिम टप्प्यात येत असताना २० पेक्षा वरच्या संख्येत असणाऱ्या जंगली हत्तींचे कळप काल विहीरगावच्या नजीक असणाऱ्या मामा तलावाच्या खालील धानपिकाच्या शेतातून गेले.त्यामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे.यात प्रवीण डोनाडकर,बंडू बनकर, लीलाधर पिल्लेवान,सुधाकर बावणे,नांदाजी नारनवरे या विहीर गावच्या शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे अतोनात नुकसान झाले आहे.

एकीकडे शेतकऱ्यांना जंगलातील वाघाची भीती असताना आता रानटी हत्तींचाही धोका वाढला आहे. आतापर्यंत वाघाद्वारे या भागात कोणतीही हानी जरी नसली तरी शेतकऱ्याच्या जीवाला वाघापासून धोका आहे.त्यात आता जंगली हत्तींद्वारे धान पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.या पट्ट्यामध्ये धान पिकाचे सर्वात जास्त पीक घेतले जाते.धानपिक आता ऐन शेवटच्या टप्प्यात आले असताना हत्ती नुकसान करत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.जंगली हत्तींना पळवून लावण्यासाठी पश्चिम बंगाल येथील एक टीम येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते.मात्र अजूनही सदर टीम न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!