Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजघरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास देसाईगंज पोलीस प्रशासनाने केली अटक….-सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप...

घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास देसाईगंज पोलीस प्रशासनाने केली अटक….-सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर आणि पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज (गडचिरोली) :- देसाईगंज पोलीस प्रशासनाने गस्ती दरम्यान देसाईगंज ब्रम्हपुरी रोड वरील विर्षी वार्ड जवळ एका संशयित इसमास विचारपूस करून ताब्यात घेतले;विचारपूस करित असताना आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावरून संशय अधिक बळकट झाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले.अधिक विचारपूस केली असता,सदर इसम हा अनेक घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचे कळले.सदर आरोपीचे नाव व्यंकटी रामा घोडमारे वय ३८ वर्ष राहणार विर्षी वार्ड देसाईगंज असे आरोपीचे नाव आहे.

सदर आरोपी हा नुकताच दोन महिन्याआधी जळगाव जेल मधून सुटला असल्याची माहिती आरोपीने दिली.  सदर आरोपी वर जळगाव,भुसावळ,चंद्रपूर, भंडारा,नाशिक,औरंगाबाद,नागपूर जिल्ह्यात घरफोडी चे गुन्हे दाखल आहेत.तसेच नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घरफोडी चा गुन्हा दाखल आहे.सदर आरोपीला देसाईगंज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन देसाईगंज येथील अनेक घरफोडी संदर्भात विचारपूस करण्याकरिता देसाईगंज पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे.सदर तपास देसाईगंज पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर हे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!