Saturday, May 30, 2026
Homeचंद्रपूरघरगुती वादातून विवाहित महिलेने नदीत उडी मारून केली आत्महत्या..

घरगुती वादातून विवाहित महिलेने नदीत उडी मारून केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील सास्ती येथील एका विवाहित महिलेने घरगुती वादातून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहे.शीतल प्रशांत मुळे वय ३८ वर्षे,रा.सम्राट चौक, बालाजी वॉर्ड,बल्लारपूर,जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव असून मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागल्याने शीतल ही सास्ती येथील आई-वडिलांकडे वास्तव्यास होती.विशेष म्हणजे,पाच वर्षांपूर्वी शितल ही आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त होऊन तिने बल्लापुरातील प्रशांत मुळे याच्यासोबत विवाह केला होता.अश्यातच पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती माहेरी निघून गेली होती.दरम्यान,दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता ती घराबाहेर पडली होती.बराच उशीर होऊनही शीतल ही घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणी पोलिसांनी परिसरातील माहितीच्या आधारे शोध घेत तपास सुरू केला.या दरम्यान,गावाजवळील  वर्धा नदी परिसरात पाहणी केली असता काल शनिवारी दुपारच्या सुमारास शीतलचा मृतदेह नदी पत्रातील पाण्यावर तरंगताना दिसून आला. लगेच मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.एका विवाहित महिलेने केवळ घरगुती वादामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर क्रत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!