- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीला आले आहेत.नैसर्गिक संकटाने बेजार झालेले शेतकरी आता रानटी हत्तींच्या नासधुसीमुळे चिंताग्रस्त होऊन मोठ्या विवंचनेत सापडले आहेत.अशातच आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरात रानटी हत्तीचा उपद्रव सुरुच आहे.शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असलेल्या शेतातील सोलर पॅनलची तोडफोड करून विहिरीत असलेली तब्बल ३५ फूट खोलीतील मोटर बाहेर काढून फेकल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरमोरी तालुक्याच्या देलोडा(बु.)येथील शेतकरी केशव शालीकराम म्हशाखेत्री यांची गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बोडधा चक शेतशिवारात शेतजमीन आहे.दरम्यान,शनिवारच्या रात्री हत्तीच्या कळपाने म्हशाखेत्री यांच्या शेतात प्रवेश केला.धान पिकाची कापणी केली असल्याने सर्वप्रथम हत्तींनी कापणी केलेल्या धानाच्या कडपांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.अडीच एकरातील धानपीक कापणी केली असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले.त्यानंतर हत्तींनी आपला मोर्चा शेतामध्ये विहिरीवर बसविलेल्या सोलर पंपाकडे वळविला.हत्तींनी सोलर पॅनलची तोडफोड केली.बदमाश हत्ती एवढ्यावरच न थांबता विहिरीमध्ये असलेली मोटार सोंडाच्या सहाय्याने बाहेर काढून फेकली.तसेच पाईपचेही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी धानाची नासाडी,तर कधी जमा केलेल्या पुंजण्याचीही नासधूस होत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.
- Advertisement -

