Monday, December 15, 2025
Homeआरमोरीआजी-आजोबांच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीला देसाईगंजच्या तरुणाने पळवले.. - आरमोरी पोलीस ठाण्यात...

आजी-आजोबांच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीला देसाईगंजच्या तरुणाने पळवले.. – आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-अल्पवयीन मुलींना पळवणे, अत्याचार करणे व इतर कृत्ये केल्यास  पोक्सो कायदा लागू होतो.पोक्सो कायद्यांतर्गत सर्वप्रथम ‘नो बेल ओनली फॉर जेल’ होत असते.तरीही काहीजण जे होणार ते बघितले जाणार,अशी भूमिका घेतांना दिसून येतात आणि सर्वकाही गमावून बसतात.अश्याच प्रकारे देसाईगंज शहरातील एका २५ वर्षीय तरुणाने चक्क एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे ती अल्पवयीन मुलगी आणि तरुण देसाईगंज शहरातीलच असल्याची माहिती आहे.प्रकरणी २५ वर्षीय अविनाश अरुण मेश्राम रा.हनुमान वॉर्ड,देसाईगंज(वडसा)याचेवर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,देसाईगंज शहरातील अल्पवयीन १६ वर्षीय तरुणी आरमोरी तालुक्यातील कुकडी येथे आजी-आजोबांच्या घरी मावशीच्या मुलीसह(मावस बहीण)गेली होती.अश्यातच अविनाश मेश्राम हा मंगळवार ३ जून २०२५ च्या मध्यरात्री तरुणीला भेटायला गेला.त्याला भेटून घरी परततांना मामा आल्याचे पाहताच अविनाशने तिला दुचाकीवर बसवून पळवून नेले.प्रकरणी तक्रारीवरून
आरमोरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलिस
उपनिरीक्षक प्रताप लामतुरे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!