उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील महायुती सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धानाला प्रतिहेक्टर २० हजार रुपयांप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याची घोषणा केली होती; पण या घोषणेला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्यात आली नाही.परिणामी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.तर बोनसची रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगामसुद्धा अडचणीत आला होता.ही बाब माजी आ.राजेंद्र जैन यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर खासदार पटेल यांनी या विषयावर काल शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बोनससाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.तसेच या विषयावर सविस्तर चर्चा केली.यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल शुक्रवारी बोनससाठी लागणारा ९०० कोटी रुपयांचा निधी मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उर्वरित रक्कम दहा दिवसांच्या आत उपलब्ध करून दिली जाईल,असे सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच बोनसची रक्कम जमा केली जाणार आहे.
आता शेतकऱ्यांचा बोनस जमा होण्याचा मार्ग मोकळा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

