Wednesday, May 27, 2026
Homeभंडारा१६ महिन्यांच्या निरागस चिमुकल्याचा ऑटोरिक्षा खाली दबून मृत्यू….

१६ महिन्यांच्या निरागस चिमुकल्याचा ऑटोरिक्षा खाली दबून मृत्यू….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- जिल्ह्याच्या तुमसर शहरातील दाट लोकवस्तीतील संकिर्ण काँक्रिट रत्यावरील ब्रेकरचा अंदाज चुकून ऑटोरिक्षा उलटून; त्यात अवघ्या १६ महिन्यांच्या निरागस चिमुकल्याचा दबून मृत्यू झाल्याची घटना काल १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.हा धक्कादायक अपघात तुमसर शहरातील विवेकानंद नगरात घडला. रेहान रहमत शाह,असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

शाह परिवार घटनेच्या दिवशी कार्यक्रमाकरिता शहर वॉर्डातून ऑटो क्रमांक एम एच ४९ बीके ६९४२ ने येथे तिरोडी निघाले होते.त्यावेळी रहमत स्वतः ऑटो चालवत होता. तर चिमुकल्या रेहानला कुशीत घेऊन आई व दोन मुले मागे बसले होते.मिळालेल्या माहितीनुसार ऑटो ब्रेकरजवळ येताच रहमतने ब्रेक दाबला त्यावेळी ऑटोचे संतुलन बिघडले त्यातच आईच्या हातातून रेहान रस्त्यावर पडला व ऑटोने पलटी घेतली.त्यात निरागस रेहानच्या मेंदूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.डोळ्यापुढे आपल्या बाळाला दगावल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!