- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-पावसाळ्याचा अख्खा जून महिना लोटून गेला,तरीही पावसाने पाठ फिरवली होती. मात्र,जुलै महिना लागणार,तोच पावसाने राज्याच्या विविध भागात कोसळधारा सुरू केल्या.यामुळे काही ठिकाणी विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.सदरची वाढ लक्षात घेता भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसीखुर्द धरणामधून वैनगंगा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी आज,शुक्रवार ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धरणाचे तीन वक्रद्वारे खुली करण्यात येणार आहेत. त्यातून अंदाजे सुमारे ३२० क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.त्यामुळे,वैनगंगा नदीपात्रामध्ये आवागमन (ये-जा)करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- Advertisement -

