Saturday, April 18, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय; 'यांना' ना गुंतवणूक करावी लागते; ना खर्च करावा लागतो…..!- केवळ वारला...

संपादकीय; ‘यांना’ ना गुंतवणूक करावी लागते; ना खर्च करावा लागतो…..!- केवळ वारला घळघळ पैसा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

संपादकीय :- एखादा व्यवसाय करतो म्हटला वा एखादे शासन स्तरावरून काम आणून बांधकाम करतो म्हटले तर त्यासाठी सर्वप्रथम अनेकांना मोठ्या प्रमाणावर पैस्याची गुंतवणूक ही करावीच लागते. गुंतवणूक केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. मात्र काही असेही कार्यकर्ते आहेत की,त्यांना ना गुंतवणूक करावी लागते; ना गुंतवणुकीवर खर्च करावा लागतो.अशा कार्यकर्त्यांना नुसता केवळ वारला घळघळ पैसा मिळत असल्याची प्रचिती पूर्वी व हल्ली निदर्शनास येऊ लागली आहे.अनेकांना प्रश्न पडला असेलच की,असे कार्यकर्ते कोण? असे कार्यकर्ते म्हणजे ‘शासकीय काम व पंधरा दिवस थांब’ म्हणविणारे विविध विभागांतील आमचे-तुमचे व सर्वांची कामे करण्यासाठी शासकीय कार्यालयांच्या छत्र-छायेत पंख्याची हवा खात बसणारे ‘लोकसेवक’. अशांना कुणाशी कसलेही देणे-घेणे नसते.त्यांना केवळ पैका मिळण्याची वाट असते.यामध्ये अनेकांची वेगवेगळी टक्केवारी ही ठरलेली असते.काहीजण टक्केवारी साठी नवनवीन फंडे वापरून कामांच्या फाईल टेबलावर ठेवतांना दिसून येत आहेत.ठरलेली टक्केवारी मिळाली नाही तर अमुक काम बरोबर नाही; तमुक काम चुकीचे आहे; अशी बतावणी करून आपलीच पोळी शेकण्याचा हल्ली ट्रेण्ड वाढलेला दिसून येतो.अशातच एखादा प्रकरण उघडकीस आल्यास त्यावर पडदा घालण्यास ‘लोकसेवक’ हे माहीर झालेले आहेत.वरिष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत ‘खेला हो बे’ सुरू झाला आहे.आपणाला नेहमी वाटते  की,दोन नंबरी म्हणजे केवळ अवैध धंदेच आहेत.मात्र सध्या स्थितीत दोन नंबरी पेक्षाही दस नंबरी उच्चांक कुणी गाठला असेल तर जनतेच्या लोकसेवकांनी. टक्केवारी मिळाली की, ‘अपना काम बनता; कही भी जाये जनता’…असे हल्ली चित्र निर्माण झाले आहे. यावर कुठे तरी अंकुश घालणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिक रात्रंदिवस जिवाचे रान करून कितीही राबले; तरीही ‘पळसाला पाने ही तीनच’ अशी म्हण जरी असली तरीही सध्याच्या घडीला कुठल्या तरी पळसाला पाने चार आलेली दिसण्यामागचे मुख्य कारण म्हणजे यांना’ ना गुंतवणूक करावी लागते; ना खर्च करावा लागतो…..!केवळ ‘त्यांना’ वारला घळघळ पैसा…मिळतो.असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!