Saturday, April 18, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय... साहेब...! एकाच पाण्याने तुरी पिकत नाही बरं..

संपादकीय… साहेब…! एकाच पाण्याने तुरी पिकत नाही बरं..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
संपादकीय :-या जगात मतलबी,कामसाधूपणा लोकांची कमी नाही.त्यांचे काम झाले की,सर्वकाही विसरून जातात.इतरांना दुरावून ज्यांच्यासाठी अथक परिश्रम घेतले,इतरांनी हिणावले अश्यावेळी धीर दिला,साथीदार म्हणून साथ दिली,परमेश्वराकडे साकडे घातले,शेवटपर्यंत कसून शेपूट धरली मात्र,आता तुम्ही कोण? म्हणणाऱ्यांची दुनियेत कमी नसल्याने “साहेब…! एकाच पाण्याने  तुरी पिकत नाही बरं..!” असे म्हणणे वावगे ठरणार नाही.आपण जेव्हा लहान असतो तेव्हा होशिन-हो लावून काम करवून घेत असतो.एकदा का मोठे झालो की,कुठला हो अन् कायचा हो..तू कोण अन् मी कोण? असे केले जाते.
पूर्वी ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ म्हणजेच प्राण गेले तरी चालेल,पण दिलेले वचन पूर्ण करणारच,अशी निष्ठा राखून कार्य केले जायचे.मात्र,सध्याच्या घडीला सुरू असलेल्या कलयुगात पूर्वीचे तर सोडाच,आज काय बोलणार व उद्या काय करणार,याची शास्वतीच राहिलेली नाही.माणसाच्या माणुसकीला काही किंमतच उरलेली नाही राव.
शहद जवळ असला की,माश्या घोंगवणारच,एकदा का शहद संपला की, इर्द-गिर्द घोंगावणाऱ्या माश्याही उडून जात असतात.अनेकांची मनधारणा झालीय की,पैश्यानेच सर्वकाही विकत घेतले जाऊ शकते; असे नाही तर त्यांना विचारा की,एखादेवेळी आपल्या नजरेसमोर एखादा अपघात झालाय तर त्याच्याकडे किती पैसे आहेत,हे आपण कधीही बघत नसतो.उलट त्याच्या मदतीला धाऊन शुभचिंतक बनत असतो. जगात आजही माणुसकी जपणारी माणसे आहेत. मात्र,याला काहीजण अपवादही आहेत.आज चुकून कळलय म्हणण्यापेक्षा चुकीची सुधारणा करणे आवश्यक आहे.माणूस मोठ्या पदावर विराजमान झाला की, त्यांना पूर्वीचे काहीही आठवत नाही; अशातला प्रकार वा भाग नसतो तर एखाद्या कडून उसनी अक्कल वापरून पुढील दशक्रिया दर्शविण्याचा प्रयत्न केला जात असतो.या दुनियेत स्वतःचे निर्णय हे स्वतःच घ्यावे लागतात.अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे झाल्याशिवाय राहणार नाही.
(सदर लेख कुणाला उद्देशून नसून सर्वसमावेशक आहे.)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!