मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त
संपादकीय :- सध्याच्या घडीला सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे घुमू लागले आहेत.अशातच कित्तेक दिवस पद ग्रहण करणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांचा जल्लोष तसेच बोलबाला होऊन त्यांच्याकडे लाखो रुपये आले असल्याची खमंग चर्चा जनमानसात सुरू आहे.मात्र ‘ज्यांना मिळाली दमडी तोच खातो आहे कोंबडी’ अशी अवस्था सध्या निर्माण झाली असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.
अनेक गावा-गावात स्वतःला अनेकजण हुशार समजून बोलबाला करीत आहेत.मात्र अशांचे नियोजन शून्य असून कितीही मोठा पदाधिकारी आणा वा आपला देखावा करा; यातच तुमचे सौख्य सामावले आहे. अनेकजण पैश्याच्या लालसेपोटी तुमच्याकडे धावून येतांना दिसून येत आहेत.ही खरी व सत्य परिस्थिती आहे.ज्याच्याकडे कसलाही कल वा साधे पाच मत घेण्याची कुवत नाही; अशा व्यक्तींना सामोरे घेऊन चालताय; यातच तुम्ही किती नियोजन करून रणनीती आखताय हे सर्व दिसून येत असल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या एका क्षेत्रातील व्यक्तीच रणनीती आखु शकतोय व ‘झुकेगा नहीं साला’ असे एका चित्रपटातील डायलॉग वास्तव्यास उतरवून दाखवीतोय; यालाच म्हटले जाते ‘रियल हिरो’ अन्यथा केवळ पैश्यासाठी देखावा व समाजाच्या नावाने मिळतोय पैका अन् हडपणारे म्हणतात तुमचा हाय का? कित्तेकजण समाजाच्या नावाने बोली लावतांना दिसून येत आहेत.मात्र ही बोली केवळ आपलेच घर भरून घोटभर दारू अन् मूठभर चिवडा वाटून अनेकांची गळचेपी करीत आहेत.व भूलथापा देऊन आपलेच घर भरीत असल्याने अशांचा घडा एक- ना एक दिवस भरणार आहे.त्यामुळे स्मशानभूमीतील ४ * ४ चा खड्डा काही दूर नाही.तुम्ही कितीही गण्या बनवा मात्र खड्डा हा निश्चितच असणार आहे; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

