Sunday, September 20, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय….-'इथे' दोघेच मिळून घेतात टक्केवारी…..!

संपादकीय….-‘इथे’ दोघेच मिळून घेतात टक्केवारी…..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

संपादकीय :- सध्या स्थितीत ‘जो करील काम त्यांनाच मिळेल दाम’ असे असले तरीही ‘इथे’ दोघेच मिळून प्रत्येक कामासाठी केवळ स्वाक्षरी करण्याची २० ते २५ टक्के;  टक्केवारी घेऊन,खीचिक नरी दाताळ्या दाखवून बाकीच्यांना पळपुट्या घोड्याची सवारी करण्यास भाग पाडीत आहेत.स्वाक्षरी कर्त्यांना केवळ वारला घळघळ पैसा मिळतोय; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.आजच्या घडीला कितीतरी जण स्वतःच्या खिशातील स्वतः पैसा खर्च करून कित्तेक काम आणीत असतात.अशातही काम आणण्यासाठी खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत अनेकांचे खिसे गरम केल्याशिवाय काम मिळत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.मात्र सदर चर्चेचा भांडाफोड झाल्यास आम्हाला काम कसे मिळणार? त्यामुळे ‘झाकली मूठ सव्वा लाखाची; असे हल्ली चित्र निर्माण झाले आहे.अशातच सार्वजनिक हिताचे काम सुरू करावयास गेल्यास ‘तो’ वा ‘ती’ म्हणते की,माझी टक्केवारी किती?असे अनेकांच्या मुखातून वाणी निघू लागते.’जो देणार सर्वात जास्त टक्केवारी; तोच चढेल घोड्याची सवारी’ असे अनेक शासकीय कार्यालय तसेच इतर ठिकाणी हल्ली निदर्शनास येऊ लागले आहे.जास्तीत-जास्त टक्केवारी मिळाली नाही तर कामात विघ्न आल्याशिवाय राहणार नाही.एकदा सगळ्यांची टक्केवारी ठरली की,विघ्नहर्ता प्रसन्न झालाय; असे समजावे लागते.आणलेल्या कामांमध्ये काम सुरू करण्याच्या पूर्वी विघ्नहर्ता प्रसन्न झाल्यास अशा कामांमध्ये कुणीही लक्ष घालणार नाही; त्यामुळे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ होण्यास सुरुवात होते.नंतर मुर्खांनी कितीही डोकावून पाहिले तरीही अशांना कुणीही विचारत नाही.एकदा घोडा मैदानी रेस मध्ये उतरला की, तिगळीक-तिगळीक सुरू होऊन कुठला तरी थांबा ठरविला जातो.थांबा आला की,इथे’ दोघेच मिळून घेतात टक्केवारी अन् ‘त्यांना’ दाखवितात पळपुट्या घोड्याची सवारी….असे समजावे लागते; उर्वरित ‘बे अक्ली  शिकून अळाणी’ झाल्या सारखे वाटतात…..!  टक्केवारी घेणाऱ्या त्या दोघांना जाब विचारला पाहिजे; काम कुठून आला, अंदाज पत्रकात तरतूद काय? किती रक्कम आहे, कोणत्या बाबींवर किती खर्च होणार? वा इतर असे अनेक प्रश्न विचारणे हे सर्वसामान्य नागरिक तसेच ग्रामस्थांचे काम आहे.मात्र याचे कुणाला कसलेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळेच झकास ऐवजी भकास कामे होतांना दिसून येतात व दोघेच मिळून कितीतरी टक्केवारी घेतात.यावर आळा घालणे केवळ तुमच्या-आमच्याच हातात असल्याने दुर्लक्ष करून चालणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!