संपादकीय
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त:- आपण सर्वच जण अचंभित झाले असालाच; की असे कोणते दुकान वा व्यवसाय आहे की,कुणाला ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे फलक(बोर्ड) लावावे लागते.अशातच कमाईचे साधन म्हणजे निव्वळ पैसाच-पैसा व आरामदायक जीवन जगणे तर आहेच; अशातही अश्या दुकानाच्या वा व्यवसायाच्या माध्यमातून तितकाच धोका व चोरांचेही पोट भरावे लागते.हेही तितकेच महत्त्वाचे आहे.आता आम्ही आपणांस सांगू इच्छितो की,असे कोणते दुकान वा व्यवसाय आहे तर,एक म्हणजे इमाने-इतबारे सुरू असलेला अवैध धंदा म्हणजे सट्टा-पट्टीचा व्यवसाय व दुसरा जोमाने व तितक्याच ताकदीने सर्वत्र- सगळीकडेच सुरू असलेला अवैध धंदा म्हणजे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय होय.अशातच सध्याच्या घडीला आणखी एका अवैध धंद्याची भर पडलेली दिसून येत आहे.ती म्हणजे अवैध रेतीचा उपसा करून शासनास करोडो रुपयांचा चुना लावल्या जात आहे. आता आपण वळूया मुख्य बाबींकडे,एखाद्या इसमाने अवैध दारू विक्रीचा धंदा वा व्यवसाय सुरू केल्यास; अशा इसमांना कुणालाही आवाज देण्याची गरजच भासत नाही.एकदा धंदा सुरू केला म्हणजे ‘गंदा है पर धंदा है’ अशी किमयाच सुरू होते.एखाद्या तळीरामास एकदा माहीत झाले की,अमुक व्यक्तीकडे गावठी,देशी, विदेशी व थंडी बीयर मिळतेय तर ‘संगत मे पंगत’ असे होऊन डोलारे सुरू होतांना दिसून येतात.त्यामुळे अशा धंद्यासाठी ना भाड्याची खोली लागते; ना कुणाला आवाज द्यावे लागते; ना दुकानाचे नाव लिहावे लागते.
मात्र याला अपवाद म्हणजे परवानाधारक दुकाने आहेत.अवैध दारू विक्री धंद्यांचा भडिमार सुरू असण्याचे मुख्य कारण म्हणजे आरामदायक जीवन, झटपट पैसा,तगडी कमाई व सोयी-सुविधायुक्त जीवनशैली तसेच ‘ना बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ हे आहे.सध्या स्थितीत काही शहरात तसेच ग्रामीण भागातील गावोगावी काही अंतरावरच अवैध दारू विक्रीच्या धंद्यांनी संसार थाटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.काही गावांमध्ये कोणती दारू मिळतेय म्हणण्यापेक्षा ‘ती’ दारू याठीकाणी आणा; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.परंतु जितकी सोयी-सुविधायुक्त जीवनशैली अशा धंद्यात आहे; तितकीच जोखीम व चोरांचे पोटही भरावे लागते.त्यामुळे अवैध दारूचे धंदे फोफावली आहेत.इमाने-इतबारे असलेला अवैध धंदा म्हणजे कागदावरचा चीटोरा; एका चीटोऱ्याला आज इतके महत्व प्राप्त झाले आहे की,दोन अंकी नाटक फसले तर समोरच्या व्यक्तीस रक्कम ही द्यावीच लागते व अशी रक्कम दिल्याशिवाय कुठलाही पर्यायच नसतो.नाहीतर मंदी आणि चालक-वाहक यांच्यावर बंदी झाल्याशिवाय राहणार नाही.यासाठीही ‘त्यांना’ ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे ‘फलक’ लावावे लागते; हे तितकेच महत्त्वाचे आहे.

