Monday, July 27, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय....असेही एक दुकान 'त्यांना' ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे 'फलक' लावावे...

संपादकीय….असेही एक दुकान ‘त्यांना’ ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे ‘फलक’ लावावे लागते……-अन् चोरांचे पोटही भरावे लागते….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादकीय

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

उद्रेक न्युज वृत्त:- आपण सर्वच जण अचंभित झाले असालाच; की असे कोणते दुकान वा व्यवसाय आहे की,कुणाला ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे फलक(बोर्ड) लावावे लागते.अशातच कमाईचे साधन म्हणजे निव्वळ पैसाच-पैसा व आरामदायक जीवन जगणे तर आहेच; अशातही अश्या दुकानाच्या वा व्यवसायाच्या माध्यमातून तितकाच धोका व चोरांचेही पोट भरावे लागते.हेही तितकेच महत्त्वाचे आहे.आता आम्ही आपणांस सांगू इच्छितो की,असे कोणते दुकान वा व्यवसाय आहे तर,एक म्हणजे इमाने-इतबारे सुरू असलेला अवैध धंदा म्हणजे सट्टा-पट्टीचा व्यवसाय व दुसरा जोमाने व तितक्याच ताकदीने सर्वत्र- सगळीकडेच सुरू असलेला अवैध धंदा म्हणजे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय होय.अशातच सध्याच्या घडीला आणखी एका अवैध धंद्याची भर पडलेली दिसून येत आहे.ती म्हणजे अवैध रेतीचा उपसा करून शासनास करोडो रुपयांचा चुना लावल्या जात आहे. आता आपण वळूया मुख्य बाबींकडे,एखाद्या इसमाने अवैध दारू विक्रीचा धंदा वा व्यवसाय सुरू केल्यास; अशा इसमांना कुणालाही आवाज देण्याची गरजच भासत नाही.एकदा धंदा सुरू केला म्हणजे ‘गंदा है पर धंदा है’ अशी किमयाच सुरू होते.एखाद्या तळीरामास एकदा माहीत झाले की,अमुक व्यक्तीकडे गावठी,देशी, विदेशी व थंडी बीयर मिळतेय तर ‘संगत मे पंगत’ असे होऊन डोलारे सुरू होतांना दिसून येतात.त्यामुळे अशा धंद्यासाठी ना भाड्याची खोली लागते; ना कुणाला आवाज द्यावे लागते; ना दुकानाचे नाव लिहावे लागते.

मात्र याला अपवाद म्हणजे परवानाधारक दुकाने आहेत.अवैध दारू विक्री धंद्यांचा भडिमार सुरू असण्याचे मुख्य कारण म्हणजे आरामदायक जीवन, झटपट पैसा,तगडी कमाई व सोयी-सुविधायुक्त जीवनशैली तसेच ‘ना बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ हे आहे.सध्या स्थितीत काही शहरात तसेच ग्रामीण भागातील गावोगावी काही अंतरावरच अवैध दारू विक्रीच्या धंद्यांनी संसार थाटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.काही गावांमध्ये कोणती दारू मिळतेय म्हणण्यापेक्षा ‘ती’ दारू याठीकाणी आणा; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.परंतु जितकी सोयी-सुविधायुक्त जीवनशैली अशा धंद्यात आहे; तितकीच जोखीम व चोरांचे पोटही भरावे लागते.त्यामुळे अवैध दारूचे धंदे फोफावली आहेत.इमाने-इतबारे असलेला अवैध धंदा म्हणजे कागदावरचा चीटोरा; एका चीटोऱ्याला आज इतके महत्व प्राप्त झाले आहे की,दोन अंकी नाटक फसले तर समोरच्या व्यक्तीस रक्कम ही द्यावीच लागते व अशी रक्कम दिल्याशिवाय कुठलाही पर्यायच नसतो.नाहीतर मंदी आणि चालक-वाहक यांच्यावर बंदी झाल्याशिवाय राहणार नाही.यासाठीही ‘त्यांना’ ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे ‘फलक’ लावावे लागते; हे तितकेच महत्त्वाचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!