Sunday, July 26, 2026
Homeभंडाराशेतात काम करतांना अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी..

शेतात काम करतांना अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेतात काम करत असतांना अचानकपणे अस्वलीने हल्ला चढवून शेतकऱ्यास जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भिवखिडकी जंगल परिसराच्या लगत असलेल्या शेत शिवारात काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.यात पवनी तालुक्याच्या केसलापुरी येथील
६५ वर्षीय शेतकरी तीरणदास सदाशिव आरिकर यांच्या अंगावर अस्वल धावून आल्याने चेहऱ्याच्या डाव्या बाजूच्या गालावरील कातडी निघून दुखापत झाली आहे.घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
६५ वर्षीय शेतकरी तीरणदास आरिकर हे नेहमी प्रमाणे शेतावर गेले होते.शेतावर काम करत असतांना लगतच्या जंगल परिसरातून आलेल्या अस्वलीने शिकार समजून हल्ला चढवला.काळीघोर अस्वल पाहून शेतकऱ्याची भंबेरी उडाली.आरडा-ओरड करून तीरणदासने पळ काढला.मात्र,अस्वलीने हल्ला चढवल्याने चेहऱ्यावर दुखापत झाली.घटनेची माहिती वन विभागास मिळताच घटनास्थळाचा पंचनामा केला व जखमी शेतकऱ्यास पवनी तालुक्याच्या अड्याळ येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.हल्ली शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी शेतात जातात,मात्र वन्य प्राणी शेतकऱ्यांवर हल्ले चढवून जिवानिशी खेळू लागल्याचा प्रकार दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!