- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शेतात काम करत असतांना अचानकपणे अस्वलीने हल्ला चढवून शेतकऱ्यास जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भिवखिडकी जंगल परिसराच्या लगत असलेल्या शेत शिवारात काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.यात पवनी तालुक्याच्या केसलापुरी येथील
६५ वर्षीय शेतकरी तीरणदास सदाशिव आरिकर यांच्या अंगावर अस्वल धावून आल्याने चेहऱ्याच्या डाव्या बाजूच्या गालावरील कातडी निघून दुखापत झाली आहे.घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
६५ वर्षीय शेतकरी तीरणदास आरिकर हे नेहमी प्रमाणे शेतावर गेले होते.शेतावर काम करत असतांना लगतच्या जंगल परिसरातून आलेल्या अस्वलीने शिकार समजून हल्ला चढवला.काळीघोर अस्वल पाहून शेतकऱ्याची भंबेरी उडाली.आरडा-ओरड करून तीरणदासने पळ काढला.मात्र,अस्वलीने हल्ला चढवल्याने चेहऱ्यावर दुखापत झाली.घटनेची माहिती वन विभागास मिळताच घटनास्थळाचा पंचनामा केला व जखमी शेतकऱ्यास पवनी तालुक्याच्या अड्याळ येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.हल्ली शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी शेतात जातात,मात्र वन्य प्राणी शेतकऱ्यांवर हल्ले चढवून जिवानिशी खेळू लागल्याचा प्रकार दिसून येत आहे.
- Advertisement -

