- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-घराच्या अंगणात असलेल्या विहिरीचे थंड पाणी अचानक गरम येऊ लागल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरू लागला आहे.नागपूरच्या काटोल शहरातील नीलकंठ फुके,रा.पॉवर हाउस परिसर,काटोल यांच्या मालकीची ही विहीर असून,ती किमान ३० फूट खोल आहे.या विहिरीचे खोदकाम फार पूर्वी करण्यात आले.विहिरीतील पाण्याचा वापर नियमित होत असल्याने पाण्याचा उपसाही होत आहे. तेव्हापासून तर दोन दिवसांपूर्वीपर्यंत या विहिरीचे पाणी थंड होते.घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे.त्यातच दोन दिवसांपासून या विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे पहिल्यांदा कामावरील कामगारांच्या निदर्शनास आले.शेजारच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केली असता ते थंड असल्याचे नीलकंठ फुके यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सदरची माहिती स्थानिक नगरपालिका प्रशासनाला दिली आहे.पाण्यातून वाफ निघत नसली तरी ते विहिरीतून काढून लगेच आंघोळीसाठी वापरण्याजोगे कोमट असून पाण्याला कुठलाही गंध नाही.त्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे,हे तपासणी अंतीच कळणार आहे.काहींच्या मते हा भूगर्भातील काही हालचालींचा परिणाम असावा,तर काहींनी गरम झरे किंवा जिओथर्मल ॲक्टिव्हिटीची शक्यता व्यक्त केली आहे.
- Advertisement -

