Saturday, May 30, 2026
Homeभंडारालाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या कारच्या समोरील टायर अचानक फुटल्याने कार मार्गावरच पलटी झाली.पलटी होताच कारने अचानकपणे पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण कार भस्मसात झाली.सुदैवाने जीवितहानी टळली,मात्र कारमालकाचे मोठे नुकसान झाले आहे.मंगेश मधुकर राऊत वय ३३ वर्षे,रा.सोनी, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे कार चालकाचे नाव ते एमएच ३३ व्ही ४१३५ क्रमांकाच्या कारने शुक्रवारी दुपारच्या सुमारास लाखांदूरहून स्वगावी जाण्यासाठी निघाले होते.चप्राळ पहाडीजवळ येताच कारचा अचानक समोरील टायर फुटला. कार भरधाव वेगात असल्याने मंगेश यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यावरच पलटी झाली.कार उलटताच इंजिनमधून धूर निघू लागला आणि अचानक मोठी आग लागली.तत्पूर्वी चालक मंगेश राऊत कारमधून निघताच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या विळख्यात आली.लाखांदूर पोलीस ठाण्यास घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले व तात्काळ लाखांदूर नगरपंचायतच्या अग्निशामक दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले.अग्निशामक पथकाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली,तोपर्यंत संपूर्ण कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!