उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने रेशनधारकांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे.उद्या म्हणजेच शुक्रवार २८ फेब्रुवारीला केवायसी करण्याची शेवटची तारीख असल्याने यासाठी रेशनधारक केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालय व रेशन दुकानदाराकडे जात आहेत; परंतु हाताचा ठसा न उमटणे,डोळ्याची समस्या येत असल्यामुळे बऱ्याच रेशनधारकांची केवायसी शिल्लक आहे.त्यामुळे धान्यपुरवठा बंद तर होणार नाही ना?अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे.शासनाने ई-केवायसी बंधनकारक केल्याने एक महिन्यापासून रेशनकार्डधारक तहसील कार्यालय,पुरवठा अधिकारी व रेशन दुकानदाराकडे गर्दी करत आहेत.मात्र,कधी ई-केवायसी मशीन बंद असल्याचे निर्देशनास येत आहे.तर कधी सर्व्हर डाऊन होत असल्याने काम ठप्प होत आहे. अशातच वृद्ध मजुरांचा व भांडी घेणाऱ्या महिलांच्या हाताच्या अंगठ्याचा ठसाच उमटत नसल्यामुळे दुकानदार व पुरवठा निरीक्षक हैराण आहेत.
रेशनकार्ड धारकांनो त्वरा करा; उद्याला केवायसी करण्याची शेवटची तारीख..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

