- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने घरच्यांचा राग मनात धरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदनखेडा येथे काल,शुक्रवार २४ जानेवारीला उघडकीस आली. अरोहण माणिक बागेसर वय १६ वर्षे रा.चंदनखेडा, ता.भद्रावती असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
अरोहण हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता.प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असतांना त्याला दारू व सिगारेटचे व्यसन लागले होते.त्यामुळे तो नियमित संस्थेत जात नव्हता. घरच्यांनी हटकले असता रागावून अरोहण हा २२ जानेवारीला घरून निघून गेला होता.घरच्या लोकांनी २३ जानेवारीला तो बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली.अशातच काल,शुक्रवारी २४ जानेवारीला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह सरकारी दवाखान्याजवळील हनुमान मंदिर परिसरातील विहिरीत आढळून आला.प्रकरणी भद्रावती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास भद्रावती पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

