- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर शहरात मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे.यात्रेवरून पती,पत्नी व चार वर्षीय चिमुकली विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमधून सोलापूरला परत येत असतांना टिकेकरवाडी स्टेशनच्या पूर्वी तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पाठीमागे डावीकडून भरधाव वेगाने एक दगड आला आणि तो दगड चार वर्षीय चिमुकलीच्या डोक्याला लागल्याने त्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार २० एप्रिल रोजी घडली.आरोही अजित कांगले असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.मुलीचा मृत्यू झाल्याचे पाहून वडील रडत रडत बोलत होते की,ती मला ‘ये पप्पा…ये पप्पा म्हणाली… माझा जीव गेला असता चाललं असतं पण…’ हा आक्रोश पाहून रुग्णालयातील उपस्थितांच्या आणि डॉक्टरांच्या देखील डोळ्यातील अश्रू अनावर झाले.
माहितीनुसार,गेल्या बऱ्याच वर्षांपासून कांगले कुटुंबीय एप्रिल महिन्यात ‘लच्चन’ यात्रा महोत्सवास जात असतात.अशातच यात्रा महोत्सवावरून विजयपूर ते रायचूर पॅसेंजर रेल्वे गाडीने सोलापूरला परत येत असतांना वाटेतच अज्ञात इसमाने एक भला मोठा दगड रेल्वे गाडीच्या दिशेने फेकला.दगड फेकताच चार वर्षीय आरोही हिच्या डोक्याला लागला.दगड डोक्याला लागताच आरोहीच्या वडिलांनी डोक्याला हात लावला.डोक्यातून प्रचंड रक्त वाहू लागल्याने रेल्वेतून उतरुन चिमुकलीला उपचारासाठी सोलापूरच्या रघुजी रुग्णालयात दाखल केले.मात्र,डॉक्टरांनी तपणी करताच मृत घोषित केले.आपल्या पोटच्या लेकीचा मृतदेह जेव्हा बाहेर आणला तेव्हा कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
- Advertisement -

