- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-आयएसओ मानांकन प्राप्त महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर वार्ड,देसाईगंज येथे आज,मंगळवार ३० जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवसानिमित्त प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांच्या आकर्षक प्रभात फेरी व मिरवणुकीने झाली.गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक,पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नवागत विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.संपूर्ण गावात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शाळेत आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,पाठ्यपुस्तके, लपुष्पगुच्छ आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या नाजूक पावलांचे ठसे घेऊन वर्गखोली सुशोभित करण्यात आली.या अभिनव उपक्रमामुळे शाळेने पालकांसह उपस्थितांचे मन जिंकले.यानंतर आयोजित पालक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहिले.पालकांनी विविध प्रश्न,सूचना आणि अपेक्षा मांडल्या.त्यावर मुख्याध्यापक खेमराज तिघरे तसेच नगरपरिषद आरोग्य सभापती चैतन्यदास विधाते यांनी सविस्तर मार्गदर्शन करून प्रत्येक प्रश्नाचे समर्पक निरसन केले.अस्मिता पचारे,विनोद नखाते, चांदेवार,बगमारे,कुथे आदी पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे देण्यात आली.त्यामुळे पालकांनी शाळेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास शासनामार्फत विशेष शिक्षक अमोल पडोळे यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच नगरपरिषद आरोग्य सभापती चैतन्यदास विधाते, प्रतिष्ठित नागरिक अण्णाजी तुपट,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे,संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालक यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मंगेश तुपट यांनी केले,तर आभार प्रदर्शन ईश्वर गहाणे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या आकर्षक रथाची सजावट तृषाली सुखदेवे,अपर्णा जडे आणि प्राची खरकाटे यांनी केली.प्रियंका तलमले व भारती राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले.शाळेतील सर्व शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले.
यावेळी कवासे यांनी गावोगावी जाऊन शाळेच्या गुणवत्तापूर्ण कार्याची माहिती पोहोचविणे,पालकांशी सातत्याने संवाद साधणे आणि शाळेविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण करण्यासाठी केलेले परिश्रम विशेष कौतुकास पात्र ठरले.त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला.
“गुणवत्तापूर्ण शिक्षण,संस्कार,आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास” या ध्येयाने वाटचाल करणारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वार्ड ही आज परिसरातील पालकांची पहिली पसंती ठरत असून,प्रवेशोत्सवाच्या या भव्य यशस्वी आयोजनाने शाळेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची आणि सामाजिक बांधिलकीची प्रभावी साक्ष दिली.
- Advertisement -

