- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-रेल्वे गाडी येताच दोन मुली रेल्वेस्थानकावर उतरल्या.उतरून इकडे-तिकडे बघून घाबरल्या. अश्यातच रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे पोलिसांना शंका आली. त्यांनी मुलींची विचारपूस केली असता दोन्ही मुली घाबरलेल्या स्थितीत बोलू लागल्या. त्यानुसार विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर त्या सख्ख्या बहिणी असल्याचे कळले.त्यातील लहान बहीण ही १५ वर्षे वयाची असल्याने पोलिसांना धक्काच बसला.सदरची घटना ही चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावर घडली असून काल बुधवारी सर्वत्र उघडकीस आली. प्रकरणी दोन सख्ख्या बहिणींना बल्लारशाह रेल्वे पोलिसांनी चाइल्डलाइनच्या मदतीने बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.दोन सख्ख्या बहिणी उत्तर प्रदेशातील महाराणी गंज येथून घरून पळून विनातिकीट ट्रेनमध्ये बसून दिल्लीकडे जाण्यास निघाल्या.परंतु, तेलंगणात पोहोचल्यानंतर संघमित्रा सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीत बसून दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठी निघाल्या असता बल्लारशाह स्थानकावर उतरल्या.रेल्वे स्थानकावर उतरताच रेल्वे पोलिसांच्या समयसूचकतेने
दोन्ही मुली सुखरूप असून मुलींची वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चंद्रपूर बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधून त्यांच्या हवाली करण्यात येणार आहे.
- Advertisement -

