Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजपाहुण्यांसोबत जेवण करायला गेले अन् चोरट्यांनी १९ लाख रुपये चोरून नेले…!-देसाईगंज शहराच्या...

पाहुण्यांसोबत जेवण करायला गेले अन् चोरट्यांनी १९ लाख रुपये चोरून नेले…!-देसाईगंज शहराच्या गांधी वार्डातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ गणल्या जाणाऱ्या देसाईगंज शहरातील स्थानिक गांधी वॉर्डातील रहिवासी हरिजितसिंग सलुजा यांच्या घरी मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १९ लाख रुपयांवर डल्ला मारत पोबारा केला.

हरिजितसिंग सलुजा यांची दुचाकीची शोरूम आहे. त्यांच्या घरी मंगळवारी पाहुणे आले होते. पाहुण्यांसोबत जेवण करण्यासाठी सलुजा कुटुंबासह हॉटेलमध्ये गेले होते.

दरम्यान,चोरट्यांनी घरात प्रवेश केला.घरातील रोख रकमेसह सोने असा एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.जेवण करून आल्यानंतर घरात चोरी झाली असल्याचे सलुजा यांच्या लक्षात आले.त्यांनी याबाबतची तक्रार देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!