Saturday, August 1, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत ‘वंदे मातरम’ ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झालीत.यानिमित्ताने राज्याच्या सांस्कृतिक खात्यातर्फे विविध शासकीय आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.हे गीत स्वातंत्र्य काळातील काळजाला ठेका चुकवणारे ठरले असून त्याचे महत्त्व भारतीय जनतेला नेहमीच प्रेरणा देणारे आहे.याच निमित्ताने आज शुक्रवारी इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंजच्या वतीने तथा तालुकास्तरीय वंदे मातरम समिती यांच्या समन्वयाने देसाईगंज आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण तथा प्रशिक्षण अधिकारी एस.एस.चौधरी यांच्या मार्गदर्शनातून १५० वा वंदे मातरम गौरव दिन म्हणून वंदे मातरम गीताचे सकाळी ९:५० वाजता सामूहिक गायन कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देसाईगंज तहसीलदार
प्रीती डूडुलकर,प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार अजय जगताप पोलीस,एपीआय संदीप आगरकर,गट विकास अधिकारी अशोक कुर्जेकर,आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे,आदर्श इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक दयाराम शिंगाडे ,वंदे मातरम कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते रोशन ठाकरे यांनी सर्व विद्यार्थीगण यांना वंदे मातरम विषयी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रीती डूडुलकर यांनी अध्यक्षीय भाषण केले.त्यानंतर वंदे मातरम गीतावर आधारित NSS स्वयंसेवक यांनी लघु नाटिका सादर करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रतीक्षा सहारे,प्रस्तावना सी.एम. गरमळे NSS समन्वयक व आभार प्रदर्शन श्री जे. टी.काटकर यांनी केले.सामूहिक वंदे मातरम गीत गायनासाठी देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालय, अनिकेत महाविद्यालय,महात्मा गांधी महाविद्यालय, मोहनसिनभाई जैवेरी कनिष्ठ महाविद्यालय,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,स्कायनेट स्कूल,जेजानी स्कूल,कुथे पाटील महाविद्यालय, युनिव्हर्सल स्कूल या सर्व शाळा, महाविद्यालयातील तब्बल ३,५०० विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.एस.जाधव,ए.व्हि. तिजारे,गटनिदेशक व्हि.वाय.नागमोती,प्रभारी गटनिदेशक आणि तालुका स्तरिय समिती साहित्यिक इंजि.विजय मेश्राम,पत्रकार राजरतन मेश्राम,महिला गट प्रमुख कल्पना कापसे,अनुलोम संस्था जिल्हा प्रमुख अमित मोराडे सर्व समिती सदस्य व संस्थेतील शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!