Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांना दिल्लीचे आमंत्रण.. - महाराष्ट्रातील तब्बल १७...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांना दिल्लीचे आमंत्रण.. – महाराष्ट्रातील तब्बल १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन सोहळ्यासाठी देशभरातील विशेष कामगिरी करणाऱ्या सरपंचांना दरवर्षी निमंत्रण दिले जाते. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या,शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदनाचा भव्य सोहळा होणार आहे.या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील तब्बल १७ सरपंचांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.यात सोलापूर,नागपूर, पुणे,अकोला,ठाण,वाशिम,गडचिरोली,अहील्यानगर, गोंदिया,भंडारा,रत्नागिरी, परभणी,सातारा,अमरावती, लातूर,सांगली आणि जळगाव इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे,गडचिरोली जिल्ह्यातून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांनाही सोहळ्यासाठी दिल्लीचे आमंत्रण मिळाले असल्याने जिल्ह्यासह तालुक्यासाठी आणि गावासाठी अभिमानास्पद तितकीच गौरवाची बाब आहे.गावातील सरपंचा अपर्णा राऊत यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्यामुळे,कोंढाळा
गावाचे नाव आता थेट राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचले आहे.
अपर्णा राऊत यांनी कोंढाळा ग्रामपंचायती अंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामांना प्राधान्यक्रम देत स्वछ भारत मिशन योजना,घरकुल योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ,हागणदारी मुक्त गाव,वृक्ष लागवड, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा,विधवा-निराधार महिलांच्या उदरनिर्वाहाची प्रश्र्ने,तरुणांसाठी अभ्यासिका,आरोग्य शिबिरे राबवून शेकडो नागरिकांना लाभ यासह विविध मंत्रालयांमार्फत गावाच्या विकासासाठी निधी मिळवून त्यांनी गावाला नवी दिशा दिली.गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज कोंढाळा गाव ‘यशवंत’ ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते.त्यांच्या या कामगिरीचा गौरव आता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणार आहे.हा सोहळा केवळ स्वातंत्र्यदिनाचा उत्सव नाही,तर गावागावांत बदल घडवणाऱ्या या नेत्यांचा सन्मान आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!