- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोलीहून आरमोरी मार्गे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने तब्बल सहा अल्पवयीन शाळकरी मुलांना जोरदार धडक दिल्याने यात चार मुलांचा मृत्यू झाला होता,तर दोन गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली होती.घडलेल्या अपघातात टिकू नामदेव भोयर वय १५ वर्षे,तन्वीर बालाजी मानकर वय १६ वर्षे या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.तुषार राजू मारबते वय १४ वर्षे व दूषण दुर्योधन मेश्राम वय १४ वर्षे या दोघांचा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.क्षितिज तुळशीराम मेश्राम व आदित्य धनंजय कोहपरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले होते.सर्व सहाही शाळकरी मुले ही गडचिरोली तालुक्याच्या काटली(साखरा)येथील रहिवासी होते.ते गुरुवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली-आरमोरी मार्गावरील काटली वरून साखरा मार्गे कसरत(व्यायाम) करण्याकरीता गेले होते.मार्गावरून पायी चालत जात असतांनाच गडचिरोलीहून आरमोरीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने सहाही मुलांना जोरदार धडक देऊन ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला होता.पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.घटनेने गावकऱ्यांचा रोष वाढलेला होता.त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.अश्यातच पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपासासाठी पाच वेगवेळी पथके तयार केली होती.पोलिसांकडून ट्रकचा कसून शोध घेतला जात असतांनाच आज,शनिवार ९ ऑगस्ट रोजी ट्रकचालक व सहकारी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.सुनील श्रीराम मारगाये वय ४७ वर्षे व प्रवीण बाळकृष्ण कोल्हे वय २६ वर्षे हे दोघेही गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड येथील रहिवासी असून दोघांनाही गडचिरोली पोलीसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे.नागपूर येथील न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या पथकाकडून प्राप्त पुराव्यांच्या आधारे ट्रकचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.घटनेचा पुढील तपास गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत.
- Advertisement -

