Sunday, August 16, 2026
Homeवर्धाऐन स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू..

ऐन स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.एकीकडे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला जात असतांनाच तीन शालेय विद्यार्थिनींचा भीषण अपघात मृत्यू झाला.सदरची घटना आज,शनिवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊच्या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेजवळ घडली. हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.समृद्धी रुपक धामसे वय १५ वर्षे,रा.संत गोमाजी वॉर्ड,हिंगणघाट,आरुही राजू चवरे वय १७ वर्षे आणि मिसबा जावेद शेख वय १७ वर्षे,रा.संत चोखोबा वॉर्ड,हिंगणघाट,जि.वर्धा अशी अपघातात मृत पावलेल्या मुलींची नावे आहेत.
आज सकाळच्या सुमारास समृद्धी धामसे,आरुही चवरे आणि मिसबा शेख या तिन्ही मुली ॲक्टिवा दुचाकीवरून स्वातंत्र्यदिनासाठी जात होत्या. त्याचवेळी आंबेडकर शाळेजवळ मागून येणाऱ्या हंश नामक भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,धडक बसताच तिन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमी मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र, तिन्ही शालेय मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहातच तीन चिमुकल्या मुलींचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

उद्याला राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे गृह(ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,रविवार १६ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात...

सिंदेवाहीत रानभाजी महोत्सव; शंभर महिला बचत गटांचे विविध रानभाज्यांचे स्टॉल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-आदिवासी दिनानिमित्त कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ९ ते १५ ऑगस्टदरम्यान रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!