Wednesday, April 15, 2026
Homeभंडाराऐन शिमग्याच्या दिवशीच १६ वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू- रंग खेळून गेला...

ऐन शिमग्याच्या दिवशीच १६ वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू- रंग खेळून गेला तलावात आंघोळीसाठी – भंडारा जिल्ह्यातील आजची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :-शिमग्याच्या दिवशी गावाशेजारील तलावावर पोहायला गेलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.चैतन्य राजेश मुटकुरे असे मृत मुलाचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे लाखनी तालुक्यातील लाखोरी गावावर शोककळा पसरली आहे.चैतन्य मुटकुरे हा उज्वल विद्यालयात १० वी वर्गात शिक्षण घेत होता.रंग उधळणी खेळून झाल्यानतंर गावातील चार ते पाच मित्रांसोबत तो गावाजवळ असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेला होता.चैतन्य हा त्याचा मित्र नमन सुधीर चेटूले आणि इतर चार मित्रांसह पाण्यात उतरला.परंतु चैतन्यला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला.पोहायला येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चैतन्य हा पाण्यात बुडू लागला.यावेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना चैतन्यला वाचविण्यात यश आले नाही.घटनेची माहिती गावात कळताच लोकांनी तलावाजवळ एकच गर्दी केली.गावकऱ्यांनी चैतन्यचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मृतहाचा शोध सुरू केला.यानंतर काही तासाच चैतन्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!