Tuesday, August 11, 2026
Homeगडचिरोलीसर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील.तसेच आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती(एसओपी)निश्चित करण्यात येईल,असे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
धानोरा तालुक्याच्या जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात रविवारच्या मध्यरात्री  दोन वाजच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना घडली.या दुर्घटनेत दीपिका इतवा लकडा (वर्ग ६ वा),सुष्मिता सरोजीत मंडल(वर्ग ८ वा)आणि अनु गाजुरं कोरेटी (वर्ग २ रा)या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
सर्पदंश झालेल्या अन्य विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.गंभीर प्रकृती असलेल्या दीपीका मडावी या विद्यार्थिनीला प्रशासनाने एअरलिफ्ट सुविधेद्वारे पुढील उपचारासाठी हलवून आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले.
सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी धानोरा येथील शवागृहात मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.त्यानंतर जपतलई येथील आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश उपस्थित होते.
  • १४ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक👇
आश्रमशाळांच्या व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात गठित विविध समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासह शासन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीने येत्या,१४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येणार असल्याचे ॲड.जयस्वाल यांनी सांगितले.या बैठकीत विद्यार्थी सुरक्षा,आश्रमशाळा व्यवस्थापन,विविध समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधितांची जबाबदारी यांचा आढावा घेऊन नवीन एसओपी निश्चित करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
  • कुटुंबीयांना आर्थिक मदत👇
दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून, त्यापैकी प्रत्येकी १ लाख रुपयांची तात्काळ मदत सुपूर्द करण्यात आली आहे.उर्वरित मदतीची प्रक्रिया सुरू आहे.याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त ५ लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.अन्य शासकीय योजनांमधूनही संबंधित कुटुंबीयांना शक्य ते सर्व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल,असे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!