Saturday, May 30, 2026
Homeआरमोरीआमदार मसराम यांचे रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश.....

आमदार मसराम यांचे रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश.. – आरमोरी तहसील कार्यालयात बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार ९ फेब्रुवारीला रेल्वे प्रकल्पाशी संबंधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आरमोरी तहसील कार्यालयात सविस्तर बैठक घेण्यात आली.रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा योग्य तो वाढीव मोबदला मिळावा तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे,ही प्रमुख मागणी या बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आली.प्रसंगी बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी मोबदला निश्चिती,जमिनीचे मोजमाप,कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब यासंदर्भातील अडचणी सविस्तरपणे मांडल्या.यावेळी आमदार मसराम यांनी विकास प्रकल्प राबवितांना शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च असले पाहिजे,कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही,याची दक्षता घेत योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन बाधित शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.यावर देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रधान यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.तसेच आरमोरी तहसील कार्यालयाच्या तहसीलदार चौधरी यांनी प्रशासनामार्फत आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही दिली.या बैठकीस महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी तसेच रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी आरमोरी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,धनपाल मिसार,जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिलीप घोडाम, कवडू शहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!