Wednesday, June 24, 2026
Homeचंद्रपूरअन् धावत्या बसने क्षणांतच घेतला पेट; जीवितहानी टळली..

अन् धावत्या बसने क्षणांतच घेतला पेट; जीवितहानी टळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-तब्बल ४० पेक्षा अधिकचे प्रवासी घेऊन गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे निघालेल्या एका इलेक्ट्रिक बसला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना आज,शुक्रवार ८ मे रोजी दुपारच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील घंटाचौकीजवळ घडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.सुदैवाने जीवितहानी टळली.मात्र, उन्हाच्या तीव्र झळांमुळे बसने काही क्षणांतच पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली.एमएच ४९ बीझेड ४१८७ क्रमांकाची इलेक्ट्रिक बस चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल बसस्थानकावरून प्रवाशांना घेऊन पुढे रवाना झाली होती.बस भरधाव वेगात असतांना बसमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना बाहेर निघण्यास सांगितले.दरम्यान,बसने काही क्षणांतच पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे  अधिकारी,पोलिस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला,मात्र तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!