Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजअनेक ओबीसी बांधव घरकुल योजनेपासून वंचित - ओबीसी बांधवांकडून इतर योजनेची मागणी....

अनेक ओबीसी बांधव घरकुल योजनेपासून वंचित – ओबीसी बांधवांकडून इतर योजनेची मागणी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- अनेक गरजू कुटुंबातील ओबीसी बांधव घरकुल योजनेपासून वंचित असल्याने इतर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांप्रमाणेच ओबीसी समाजातील बांधवांकरिता विशेष वेगळी  घरकुल योजना सुरू करण्यात यावी.अशी मागणी ओबीसी समाजाकडून जोर धरू लागली आहे.

शासनातर्फे अनुसूचित जाती,जमाती,एनटीव्हीजे साठी वेगवेगळ्या प्रकारच्या घरकुल योजना सुरू आहेत.अशातच विविध समाजातील एकंदरीत वेगवेगळ्या जाती-धर्मातील नागरिकांकरिता केवळ पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित असल्याने पाहिजे त्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गातील गोरगरीब व गरजू कुटुंबातील नागरिकांना घरकुलाचे लाभ मिळत नाही.राज्यात व जिल्ह्यात सर्वाधिक संख्या ओबीसी समाजाची आहे.गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यामध्ये ६० टक्के ओबीसी बांधव वास्तव्यास आहेत.ओबीसी समाजातील अनेक कुटुंबातील सदस्य केवळ पंतप्रधान आवास योजना सुरू असल्याने घरकुलाचे लाभापासून वंचीत असल्याचे कळते.काही घरकुल योजनांमध्ये पुन्हा-पुन्हा घरकुलाचे लाभ दिल्या जात असल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत.मात्र ज्यांनाअतिआवश्यक आहे.अशा लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ दिले जात नाही.ग्रामीण भागातील अनेक ओबीसी बांधव अजूनही घरकुलाचे लाभ मिळण्याच्या आशेवरच जीवन जगत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

यासाठी शासन स्तरावरून ओबीसी समाजातील गोर-गरीब व गरजू कुटुंबातील सदस्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवा याकरिता पंतप्रधान आवास योजने व्यतिरिक्त विशेष वेगळी इतर योजना सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!