Thursday, April 16, 2026
Homeभंडाराखाजगी फायनान्स कंपनीने कर्जदाराच्या घराला ठोकले कुलूप.....! - मुलीच्या लग्नासाठी घेतले होते...

खाजगी फायनान्स कंपनीने कर्जदाराच्या घराला ठोकले कुलूप…..! – मुलीच्या लग्नासाठी घेतले होते कर्ज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- खासगी फायनान्स कंपनीकडून मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज परत करण्यास उशीर झाल्याने फायनान्स कंपनीने चक्क कर्जदाराच्या घराला कुलूप ठोकले. सदर प्रकार मोहाडी तालुक्यातील खडकी येथे मंगळवारी दुपारी घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासगी फायनान्स कंपन्या कर्जवसुलीसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात, याची प्रचीती खडकी येथे आली.

खडकी येथील बाबू गणपत वहिले यांनी मुलीच्या लग्नासाठी व व्यवसाय करण्यासाठी महिंद्रा फायनान्स कंपनीकडून पाच वर्षांपूर्वी तीन लाखांचे कर्ज घेतले होते. व्यवसाय बुडाल्याने आहे.कर्ज थकीत झाले. कर्ज फेडण्यास उशीर झाल्याने महिंद्रा फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांनी ही अत्यंत निष्ठुर कारवाई केली.कर्ज फेडण्यास आणखी मुदत देण्यात यावी, तसेच लावलेले कुलूप उघडण्यात यावे;अशी बाबू वहिले यांची विनंतीही धुडकावून लावण्यात आली.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या राहत्या घराला चक्क कुलूप ठोकून सील लावले.तसेच दरवाजावर नोटीस लावली.फायनान्स कंपन्या कर्ज देताना मोठे आमिष दाखवतात.मात्र कर्जाचा एक हप्ता थकला तरी घराला सील ठोकतात.याप्रकरणी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!