Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजअखेर 'त्या' अनोळखी व्यक्तीची ओळख पटली... - देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारात गळफास...

अखेर ‘त्या’ अनोळखी व्यक्तीची ओळख पटली… – देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारात गळफास घेऊन केली होती आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळ एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल,शनिवारी १९ ऑक्टोंबरच्या दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने परिसरातील शेतकरी शेत बांधावर गेले होते.अशातच काही शेतकऱ्यांना एक अज्ञात इसम शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.काहींनी जवळ जाऊन बघितले असता,अनोळखी इसमाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली असल्याचे लक्षात आले.लगेच नागरिकांनी याबाबत देसाईगंज पोलीस ठाण्याला माहिती दिली.देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.रात्री पर्यंत इसमाची ओळख पटलेली नसल्याने देसाईगंज पोलिसांपुढे मोठे आवाहन होते. त्यानुसार ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक माने,बिट अंमलदार मदन मडावी व सहकारी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अखेर आज,रविवारी २० ऑक्टोंबरला अनोळखी इसमाची ओळख पटली.
विकास अशोक गुरूनुले वय २८ वर्षे रा.सरडपार, ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.विकास हा आरमोरी तालुक्याच्या रामाळा येथील सासुरवाडीला आला होता.त्याची पत्नी बाहेरगावी कामाला गेली होती. अशातच त्याने काल,शनिवारी १९ सप्टेंबरच्या दुपारी गळफास कां घेतला? हे अद्यापही गुलदस्त्यात असून पुढील तपास कुरुड-कोंढाळा बिट अंमलदार मदन मडावी हे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!