Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंजशाळेतील शिक्षकांमध्ये वाढली स्पर्धा; शाळेची पटसंख्या टिकवून ठेवण्याचे मोठे आवाहन…

शाळेतील शिक्षकांमध्ये वाढली स्पर्धा; शाळेची पटसंख्या टिकवून ठेवण्याचे मोठे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-राज्यात स्वयंअर्थसहायित तसेच कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांची कॉन्व्हेंट संस्कृतीने भुरळ घातली आहे. मराठी माध्यमाच्या सरकारी व खासगी अनुदानित शाळेला विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.शाळेची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी नजीकच्या शाळेतील शिक्षकांमध्ये स्पर्धा वाढली आहे.जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत असून काही शाळांची विद्यार्थी गणपूर्ती झाली.तर अनेक शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत.कॉन्व्हेंट संस्कृतीपुढे मराठी शाळा टिकतील काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरवर्षी संचमान्यतेनुसार शिक्षकांची संख्या ठरत असून विद्यार्थी कमी झाल्यास शिक्षकांना अतिरिक्त होतात.कुठल्याही शाळेत जाण्यापेक्षा आपल्याच शाळेत नोकरी टिकावी या अपेक्षेने अनेक शिक्षक विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात असतात.आजघडीला मराठी शाळा पेक्षा कॉन्व्हेंट संस्कृतीकडे पालक मोठ्या प्रमाणात वळत आहेत.यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत असल्याने पुढे मराठी शाळांचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा येऊन ठाकला आहे.

राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत २५ टक्के राखीव जागेवर पाल्याला प्रवेश मिळावा म्हणूनही पालकांची धडपड सुरू असते.त्यामुळे दिवसेंदिवस मराठी शाळातील विद्यार्थी संख्या रोडावत चालल्याने शाळांची संख्या घटत आहे.स्वयंअर्थसहायित शिक्षण संस्थांच्या टोलेजंग इमारती,वेगवेगळे गणवेश,सूटबूट आणि टायमधल्या कॉन्व्हेट संस्कृतीकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वळत आहेत.परिणामी ग्रामीण शाळांत विद्यार्थी संख्या रोडवली असून कशाबशा शाळा चालताहेत; हे वास्तव आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!