Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजबचत गटांच्या नावाखाली अवैध सावकारी…-पाच ते दहा टक्क्यांपर्यंत वसूल केला जातो व्याज..

बचत गटांच्या नावाखाली अवैध सावकारी…-पाच ते दहा टक्क्यांपर्यंत वसूल केला जातो व्याज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार करीत आर्थिक उन्नती साधावी म्हणून शासन प्रयत्नरत आहे.त्यासाठी शासन उमेद अभियानाच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करून देते.मात्र काही बचतगटाच्या महिलांनी या कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी न करता अधिक व्याजाने (पाच ते दहा टक्के) कर्ज देत सावकारी करीत असल्याचे चित्र तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

शेतीचा हंगाम बिनभरवशाचा असल्याने व महागाई वाढल्याने शेतकरी,शेतमजुरांचे आर्थिक गणित बिघडते.अशा परिस्थितीत बँकांचा दरवाजा ठोठावला जातो.मात्र,बँकेच्या क्लिष्ट त्रुटी पाहून शेतकरीच चक्रावतो.बँक नको ते कारण सांगून कर्ज देण्यास टाळत असल्याने पर्यायाने शेतमजुरांना बाहेरील कर्ज घ्यावे लागते.याचाच फायदा काही बचतगटाच्या नावावर करीत आहेत.बचतगटाच्या माध्यमातून महिलांची उन्नती साधावी,यासाठी शासनाचा उद्देश चांगला असला तरी काही महिला गटाच्या नावाखाली इतरांना व्याजाने पैसे देतात.व्याजाचा धंदा करीत आहेत.विशेष म्हणजे, हे व्याज एक किंवा दोन टक्के नसते तर थेट पाच ते दहा टक्क्यांपर्यंत व्याज वसूल केले जात आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी व बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे.या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंत शिक्षा किवा ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!