Friday, April 17, 2026
Homeदेसाईगंजतेंदुपत्ता संकलन करताय;जंगलात वाघ तर नाही ना…!कोंढाळा,उसेगांव, शिवराजपुर,कासवी,एकलपुर व परिसरातील नागरिक भयभीत..

तेंदुपत्ता संकलन करताय;जंगलात वाघ तर नाही ना…!कोंढाळा,उसेगांव, शिवराजपुर,कासवी,एकलपुर व परिसरातील नागरिक भयभीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यात तेंदुपत्ता संकलनाला सुरुवात झाली आहे.मात्र,मागील गेल्या वर्षांमध्ये तालुक्यातील कोंढाळा,उसेगांव, शिवराजपुर,कासवी,एकलपुर व इतर जंगल परिसरात मानव-वन्यप्राणी संघर्ष होऊन वाघाच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला.जंगलव्याप्त परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. तालुक्यातील नागरिकांना वाघाच्या दहशतीत आजही जीवन जगावे लागत आहे.परिणामी गावातील नागरिक तेंदुपत्ता संकलन तर करीत आहेत; मात्र तेंदुपत्ता संकलन करतांना मनात भीती बाळगून वाघ,वाघीण वा इतर हिंस्त्र प्राणी हल्ला तर चाढविनार नाही ना..! अशी नागरिकांची मनधारणा झाली असल्याने पाहिजे त्या प्रमाणात तेंदुपत्ता संकलणातून रोजगार मिळेनासा झाला आहे.

देसाईगंज तालुक्यातील अनेक गावे जंगल परिसराला लागून आहेत.त्यामुळे या गावा लगतच घनदाट जंगल असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांचा वावर आहे.दरम्यान,गेल्या वर्षांमध्ये मानव-वन्यप्राणी संघर्ष होऊन वाघाच्या हल्ल्यात अनेक शेतकरी, गुराखी,महिलांचा बळी गेला.घरातील कर्ता कुटुंब प्रमुख गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे.त्यामुळे नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत.

देसाईगंज तालुक्यात धानपीक झाल्यावर रोजगाराचे कुठलेही साधन नाही.त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिक तेंदुपत्ता संकलनाच्या रोजगारावर अवलंबून असतात.यातून मिळणाऱ्या मिळकतीने कुटुंबाची घडी बसण्यास मोठा हातभार लागतो.तर,शेतीच्या हंगामासाठी लागणाऱ्या खर्चाला,गरीब कुटुंबातील मुलामुलींच्या लग्नालाही मदत होते.

त्यामुळे नागरिक तेंदुपत्ता संकलनाची चातकासारखी वाट बघत असतात.मात्र, होणाऱ्या मानव- वण्यप्राणी संघर्षाच्या भीतीने नागरिक भयभीत झाले असून तेंदुपत्ता संकलन सुरू झाले असले तरी नागरिकांना जेमतेम बोटावर मोजण्याइतकेच दिवस तेंदुपत्ता संकलनास मिळत असतात.त्यामुळे मानव- वण्यप्राणी संघर्ष होऊ नये; याकरिता वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!