Monday, July 27, 2026
Homeचंद्रपूरमहाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचाऱ्यांचा मुंबई विधानसभेवर धडक मोर्चा.....- येत्या २०...

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचाऱ्यांचा मुंबई विधानसभेवर धडक मोर्चा…..- येत्या २० जुलै ला धडकणार मोर्चा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरपना ता.प्र./नितेश केराम

चंद्रपूर(कोरपना) :- कोरपना तालुक्यातील सुमारे ५२ ग्रामपंचायतचे कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणीसाठी गेल्या वीस वर्षा पासून शासन दरबारी  आपल्या व्यथा मांडीत आहेत.परंतु सदर कर्मचाऱ्यांकडे अजून पावेतो शासन दुर्लक्ष करीत असल्याने येत्या २० जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचारी; मुंबई येथील विधानसभेवर धडक मोर्चा देणार आहेत.ग्रामपंचायत कर्मचारी रात्रंदिवस गावाची धुरा सांभाळत आहेत.कोरोना काळात जीवाचे रान करून जनतेची सेवा केली आहे.काही जणांना जास्त वेतन वा मानधन देऊन ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांना तुटपुंजे वेतन व मानधन दिले जात असल्याने शासनाने ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांची थट्टा चालविली आहे.

ग्रामपंचायतीचे कर्मचारी शासन दरबारी आपल्या हकाच्या मागणीसाठी गेल्या वीस वर्षापासून शासन दरबारी जाऊन आपल्या व्यथा मांडत आहे.परंतु या कर्मचाऱ्यांकडे अजूनहि शासन दुर्लक्ष करीत आहे.आजच्या घडीला अंगणवाडी सेविकेला जवळपास १० ते १२ हजार रुपये आणि अंगणवाडी मदतनीस यांना ८ हजार रुपये तर ग्रामसेवक यांचे वेतन सुमारे ७० हजार रुपये आहे.तर ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांना शासन ठेंगा दाखवीत असल्याने ग्रामपंचायत कर्मचऱ्यांना वेतन व जुनी पेन्शन लागू  करण्यात यावी व इतर विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचारी मुंबई विधानसभेवर धडक मोर्चा देणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!