Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरमहाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचाऱ्यांचा मुंबई विधानसभेवर धडक मोर्चा.....- येत्या २०...

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचाऱ्यांचा मुंबई विधानसभेवर धडक मोर्चा…..- येत्या २० जुलै ला धडकणार मोर्चा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरपना ता.प्र./नितेश केराम

चंद्रपूर(कोरपना) :- कोरपना तालुक्यातील सुमारे ५२ ग्रामपंचायतचे कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणीसाठी गेल्या वीस वर्षा पासून शासन दरबारी  आपल्या व्यथा मांडीत आहेत.परंतु सदर कर्मचाऱ्यांकडे अजून पावेतो शासन दुर्लक्ष करीत असल्याने येत्या २० जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचारी; मुंबई येथील विधानसभेवर धडक मोर्चा देणार आहेत.ग्रामपंचायत कर्मचारी रात्रंदिवस गावाची धुरा सांभाळत आहेत.कोरोना काळात जीवाचे रान करून जनतेची सेवा केली आहे.काही जणांना जास्त वेतन वा मानधन देऊन ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांना तुटपुंजे वेतन व मानधन दिले जात असल्याने शासनाने ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांची थट्टा चालविली आहे.

ग्रामपंचायतीचे कर्मचारी शासन दरबारी आपल्या हकाच्या मागणीसाठी गेल्या वीस वर्षापासून शासन दरबारी जाऊन आपल्या व्यथा मांडत आहे.परंतु या कर्मचाऱ्यांकडे अजूनहि शासन दुर्लक्ष करीत आहे.आजच्या घडीला अंगणवाडी सेविकेला जवळपास १० ते १२ हजार रुपये आणि अंगणवाडी मदतनीस यांना ८ हजार रुपये तर ग्रामसेवक यांचे वेतन सुमारे ७० हजार रुपये आहे.तर ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांना शासन ठेंगा दाखवीत असल्याने ग्रामपंचायत कर्मचऱ्यांना वेतन व जुनी पेन्शन लागू  करण्यात यावी व इतर विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचारी मुंबई विधानसभेवर धडक मोर्चा देणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!