- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित बँकांकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी वाढत आहे.याच नाराजीने एका शेतकऱ्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यात कर्जमाफीच्या मागणीसाठी अनोख्या आणि लक्षवेधी पद्धतीने आंदोलन केले.राजुरा तालुक्यातील गायेगाव येथील शेतकरी दिवाकर हिरामण पाहणपट्टे यांनी थेट बैलावर बसून तहसील कार्यालय गाठले आणि “कर्जमाफी झालीच पाहिजे” असे म्हणत संपूर्ण तहसील कार्यालय परिसरात फेरी मारली.विशेष म्हणजे,सरकार कर्जमाफीची घोषणा करतेय,पण त्याची अंमलबजावणी करण्यास विलंब लावत असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
- Advertisement -

