Friday, August 28, 2026
Homeभंडाराआता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले परतवून लावण्यासाठी आणि मजुरांचा जीव वाचवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एक अत्यंत भन्नाट युक्ती शोधून काढली आहे.वाघांना भुलविण्यासाठी वनविभागाने चेहऱ्यामागे चेहरा अर्थात मानवी मुखवटा लावण्याचा प्रयोग सुरू केला आहे.विशेष म्हणजे,पश्चिम बंगालमधील सुंदरबनच्या जंगलात मध गोळा करणारे लोक वाघांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात. तीच सुंदरबनची कल्पना आता भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात राबवली जात आहे.प्रामुख्याने मोहफुले वेचतांना आणि तेंदूपाने तोडतांना मजूर वाकून काम करतात,ज्यामुळे ते वाघासाठी सहज शिकार ठरतात.यासाठी मुखवट्याचा प्रयोग सुरू करण्यात आल्याने आता वाघही पूर्णपणे गोंधळात पडणार आहेत आणि समोरच्यावर हल्ला करायचा की नाही?असा पेचप्रसंग त्यांच्यासमोर निर्माण होणार आहे.
साकोली तालुक्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याने खळबळ उडाली होती.यावर उपाय शोधतांना जिल्ह्यातील पवनी मॉडेल आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.पवनी वनपरिक्षेत्रात दोन वर्षांपूर्वी सर्वप्रथम नागरिकांना मुखवटे वाटप करण्यात आले होते.वाघ हा नेहमी दबा धरून मागून हल्ला करतो ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.माणसाच्या डोक्याच्या मागील बाजूस मानवी मुखवटा लावल्यामुळे वाघाला दोन्ही बाजूंनी माणूस आपल्याकडेच पाहत असल्याचा भास होतो.यामुळे वाघ आपली शिकारीची संधी गमावल्याचे समजून हल्ला टाळतो.या कल्पक प्रयोगामुळे पवनी परिसरात गत दोन वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
सध्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम जोरात सुरू असून हजारो मजूर पहाटेपासून जंगलात जात आहेत. तेंदूपत्ता तोडणाऱ्या या मजुरांचा हिंस्त्र वन्य प्राण्यांपासून बचाव करण्याकरिता सहाय्यक वनसंरक्षक साकोली संजय मेंढे व लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी जंगलात जाणाऱ्या मजुरांना प्लास्टिकचे मानवी मुखवटे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.नुकतेच वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांच्या नेतृत्वात जांभळी सडक सहवन क्षेत्रातील बरडकिन्ही बिटात मजुरांना हे मुखवटे देण्यात आले.यावेळी जांभळीचे क्षेत्रसहाय्यक आर.जी. मेश्राम,बरडकिन्हीचे बीटरक्षक सुधीर कुंभरे व शीघ्र कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!